ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती आई असावी तर जिजाऊ सारखी! मला उद्याचा बदल हवा आहे. का आपन भरकटतोय ? call 09595481717 "माझ स्वप्न-माझ ध्येय!! जिजाऊ- घरा घरात जिजाऊ !Call:9595481717" Home राजमाताजिजाऊ शिवाजीराजे संभाजीराजे मराठाआरक्षण आण्णासाहेब चौधरी नौकरी: सौजन्य महान्यूज
Showing posts with label बातमी. Show all posts
Showing posts with label बातमी. Show all posts

Wednesday, December 23, 2009


स्वयं सहाय्यता बचत गट - अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा

Saturday, October 31, 2009

तू माझ्याशी लग्न करशील….?

तू माझ्याशी लग्न करशील….?
तू माझ्याशी लग्न करशील….?


एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भालुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्या आहे. तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील…

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखया म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नस मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवांभरच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुळशी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण……….
एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील….

तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्या लग्नाला मी नक्की येईन,
माझ्या शुभेच्छा मी तुला देईन;
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

मी वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर,
पण तुला माझी भावना कधीच कळली नाही;
आणि आता कळूनही फायदा नाही,
त्यासाठीची योग्य वेळ आता उरली नाही;
एकांतात बसून मी, तुझ्याच आठवांना स्मरीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

प्रेम व्यक्त करण्याचं धाडस,
माझ्याकडून झालंच नाही;
शब्दांना ओठांबाहेर,
कधी पडताच आलं नाही;
माझ्या दुःखाचे निखारे आता, मी कागदावरच जपीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्यासाठी लिहीलेल्या कवितांना,
आता काहीच अर्थ उरला नाही;
तुझ्याचसाठी रचलेल्या गीतांचा,
सूर कधीही जुळला नाही;
तुझ्या आग्रहाखातर सखे, मी मंगलाष्टके गाईन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्या सोबत जगण्याची;
स्वप्नं आता विरून गेली;
हळव्या माझ्या ह्रदयाला,
यातना देऊन गेली;
आयुष्यभर आता मी, माझाच अपराधी राहीन.....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

जोड़ीदार निवडताना........



प्रेमात पडलं की असच होणार !
प्रेमात पडलं की असच होणार !

दिवस रात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या तिच व्यापुन उरणार
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...

डोळ्यात तिच्या आपल्याला स्वप्नं नवी दिसणार,
तिच्या हास्यातुन आपल्यासाठी चांदणे सांडणार,
ऐश्वर्याचा चेहरा सुध्धा मग
तिच्यापुढे फिका वाटणार!
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...

तिच्या फोनची आपण दिवसभर वाट पाहणार,
मित्रांसमोर मात्र बेफिकीरी दाखवणार
न राहवुन शेवटी आपणच फोन लावणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार ...

Messages नि तिच्या Inbox आपला भरुन जाणार,
तिचा साधा Message पण आपण जपुन ठेवणार
प्रत्येक Senti Message पहिला तिलाच Forward होणार,
तुमच काय, माझं काय,

प्रेमात पडलं की असच होणार !

जगाची भाषा (?) आणि आपण

जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
प्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,

जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का?


श्री० सुधन्वा बेंडाळे यांनी ’समर्थ मराठी संस्थे’च्या ’कोहिनूर’च्या २००७ सालच्या वार्षिक अंकात लिहिलेला लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे तो पहा.

जगाची भाषा आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

विविध संस्थांनी केलेल्या आपापल्या पाहणीनुसार आणि प्रत्येक भाषेत कुठल्या बोली भाषा समाविष्ट करतात यानुसार इंग्रजी भाषा जगात दुसरी, तिसरी किंवा चौथी सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते. मात्र भाषक-संख्या हाच निकष लावायचा असल्यास एकच भाषा निर्वादितपणे ’जगाची भाषा’ ठरू शकते आणि ती म्हणजे चिनी (मॅंडॅरिन) हीच भाषा. पण ते कोणी मान्य करणार नाही.

इंग्रजी किंवा इतर भाषा आवश्यकतेप्रमाणे जरूर शिकाव्या, त्यांवर प्रभुत्वही मिळवावे. पण ते ज्ञान लवकरात लवकर मातृभाषेत आणावे. म्हणजे इतर मराठी समाजाला त्याचा फायदा होईल. मातृभाषेतील शिक्षणाला पर्यायच असू शकत नाही हे जगभरातील विद्वान व भाषातज्ञ सांगतात. भारतातील अनेक तज्ञांनीही आतापर्यंत तेच सांगितले. हल्लीच्या ‘इंडिया’मधील made in USA असलेले तज्ज्ञ मात्र याला अपवाद आहेत.

साध्य आणि साधन या दोन पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. आपण त्यात गल्लत करता कामा नये. ज्ञान हे आपले साध्य असते आणि ते मिळवण्यासाठी भाषा हे साधन असते. ज्ञान हे इंग्रजी, जर्मन, जपानी, संस्कृत, बंगाली, हिंदी आणि आपली मातृभाषा अशा कुठल्याही भाषेत मिळवता येते. पण भारतात आपण “केवळ इंग्रजी भाषा म्हणजेच ज्ञान” अशी गल्लत करतो. इंग्रजी शिकलो नाही तर आपल्याला ज्ञान मिळवण्याची सुतराम शक्यता नाही असा आपण ग्रह करून घेतलेला आहे. खरं म्हणजे, आपल्या भारतीय भाषा सक्षम केल्या तर मराठी समाजाला आपण बरेचसे शिक्षण आपल्या भाषांमध्ये नक्कीच देऊ शकतो. आपल्या भाषा शासनव्यवस्था, संवादभाषा, माहितीभाषा या सर्वांसाठी आवश्यकतेप्रमाणे विकसित करू शकतो. स्वभाषेबद्दलचा न्यूनगंड निग्रहाने बाजुला सारून इंग्रजांनी आपली गावठी आणि असंस्कृत समजली भाषा समृद्ध करून इतक्या प्रगत आणि मानाच्या स्थानाला आणून ठेवली; इतरही अनेक राष्ट्रांनी आपापल्या भाषांची आधुनिक काळात प्रगती केली. तसे भारतीयांना का शक्य होणार नाही?

युरोप, आशिया, आफ्रिका, अमेरिका, अशा विविध खंडात असे अनेक प्रगत-अप्रगत देश आहेत की ज्यामध्ये इंग्रजी ही भाषा फारशी माहित नसते. जपानमध्ये शिक्षण, शासनव्यवस्था, उद्योगधंदे, संशोधन या पैकी कुठल्याही क्षेत्रात इंग्रजीला फारसे स्थान नाही. बेंडाळेंच्या प्रस्तुत लेखात सुचविल्याप्रमाणे जपानमध्ये मुख्यतः दुभाषेमंडळी परकीय भाषा शिकतात, कारण केवळ त्यांचाच व्यवसाय मुख्यत्वेकरून त्यांच्यावर अवलंबून आहे. जपानमध्ये इतर कोणाचेही अंतर्गत व्यवहारात इंग्रजीवाचून अडत नाही. उलट जपानशी व्यवहार-उद्योग करायचा तर इतर देशांना त्यांच्या भाषेत संपर्क साधायला लागतो. जपानी भाषेत नसणार्‍या संस्थळांकडे जपानमधील जनता फारसे लक्षच देत नाही. जपानमधील उच्चशिक्षणच नव्हे तर संशोधनही इंग्रजीच्या कुबड्यांशिवाय चालते. जपानमधील ज्या तज्ज्ञांनी नोबेल पारितोषके मिळवली त्यांनी आपले संशोधन आपल्या भाषेतच केले !

तसेच इस्रायलचे उदाहरण घेऊ. त्या देशाला भारतानंतर ९ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी हिब्रू भाषा ही जवळजवळ मृतवत्‌ झालेली भाषा होती. ज्यू लोक जगभर विखुरलेले होते आणि त्यांनी त्या-त्या ठिकाणची स्थानिक भाषा तसेच संस्कृतीसुद्धा आपलीशी केली होती. महाराष्ट्रातही बरेच ज्यू (बेणे इस्रायली) होते. कोकणातील रायगड (पूर्वीचा कुलाबा) जिल्हा इथे बर्‍याच ज्यूं लोकांची वस्ती होती. चौलकर, पेणकर, रेवदणकर अशी त्यांची गावावरून आडनावे होती. त्यांची संस्कृती, रूढी, रीतिरिवाज, हे सर्व मराठी संस्कृतीत पूर्णतः मिसळलेले होते. मराठी हीच त्यांची मातृभाषा होती. अशा प्रकारे जगभरचे ज्यू इस्रायलच्या निर्मितीनंतर एकत्र आले; पण त्यातील अनेकांना हिब्रू भाषेची तोंडओळखही नव्हती. हिब्रूची शब्दसंख्याही फार मर्यादित होती. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर भाषेची प्रगल्भता आणि संपन्नता या दोन्ही दृष्टींनी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती असूनही स्वाभिमानपूर्वक इस्रायलमध्ये हिब्रू हीच देशाची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून तिची वेगाने एवढी प्रगती केली की त्या भाषेत शिक्षण घेऊन शिकलेल्या संशोधकांच्या द्वारा इस्रायलमध्ये भारतापेक्षा कितीतरी अधिक संशोधन चालते. संरक्षण सामुग्री, शेतकी तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी क्षेत्रात तो इवलासा देश भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रगत आहे. इस्रायलने स्वभाषेच्या बाबतीत जे गेल्या ६० वर्षांत साध्य केले त्याच्या एक दशांशही आपण करू शकलो नाही हे वास्तव आहे.

ज्या-ज्या स्वाभिमानी देशांनी आपापल्या भाषा पुरेशा सक्षम केल्या त्या इंग्रजीतर देशांनी (जपान व इस्रायल सकट) विज्ञान, गणित अशा विषयांमध्ये भरपूर प्रगती केली. त्यातील अनेक देशांनी विज्ञान, गणितातील संशोधनासाठी नोबेल पारितोषके (बहुधा इंग्रजी भाषक देशांपेक्षा अधिक) मिळवली आहेत. आपण मात्र आमच्या भाषा या ज्ञानभाषा, उच्चशिक्षणभाषा, संवादभाषा होऊच शकत नाही असा गळा काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो व उंदरांसारखे पुंगीवाल्या इंग्रजीच्या मागे लागतो. त्याचा परिणाम एवढाच की सर्व क्षेत्रांत लायकी असूनही आपण इतर स्वकर्तृत्ववान देशांच्या मागेच राहतो. म्हणून शेवटी भारतीय वंशाच्या व्यक्तीने परदेशात केलेल्या शिक्षणाच्या आणि संशोधनाच्या बळावर नोबेल पारितोषक मिळवले की “तो माणूस मूळचा भारतीय वंशाचाच आहे” असे म्हणून आपलीच पाठ थोपटून घेतो. तसं म्हटलं तर डार्विनच्या उत्क्रांतिवादाप्रमाणे आपण सर्वच अमिबापासून जन्माला आलेले आहोत. म्हणजे सर्व मूळ एकाच वंशाचे. मग “नोबेल पारितोषक मिळवणारा प्रत्येकच माझ्या वंशातला” असे म्हणून आपण स्वतःची पाठ थोपटून घ्यायलाही काहीच हरकत नाही.

इंग्रजी माध्यमातील शिक्षणाबद्दल महात्मा गांधींनी दूरदृष्टीने काढलेले उद्गार आठवतात.

“The foreign medium has caused a brain fag, put an undue strain upon the nerves of our children, and made them crammers and imitators, unfitted them for original work and thought and disabled them from filtrating learning to the family or masses.” (Young India, 1-9-1921)

“परकीय माध्यमामुळे बालकांच्या मेंदूला थकवा येतो. त्यामुळे त्यांच्या मज्जासंस्थेवर अनाठायी ताण येऊन ती फक्त घोकंपट्टी करू लागली आहेत. परिणामी मूलभूत आणि स्वतंत्र संशोधन व विचारांकरता ती अपात्र बनली आहेत. त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या कुटुंबाला अथवा समाजाला उपयोग होत नाही.”

या उद्गारांत गांधीजींनी भारताच्या भाषिक यशापयशाची कुंडलीच मांडली होती असे म्हणावे लागेल. गांधीजींच्या या भविष्यवाणीचा प्रत्यय आपल्याला पावलोपावली येत आहे; पण तरीही आपण त्याच्या मूलभूत कारणांचा विचारच करीत नाही. ऍलोपॅथीमधील काही अयोग्य औषधांच्या दीर्घकालीन वापराने त्याचा दुष्परिणाम (side effects) वाढत जातो व दुखणे कमी करण्याचा चांगला परिणाम कमी होत जातो. पण तसे झाल्यावर ते औषध बंद करून दुसरे योग्य औषध देण्याऐवजी बर्‍याचदा डॉक्टर त्याच औषधाची मात्रा वाढवीत जातो. त्यामुळे दुखणे बरे न होता उलट इतर अपाय अधिकाधिक होतात; तसाच आपला भाषा धोरणाचा प्रयोग आहे.

बेंडाळेंच्या लेखातील जपानी अधिकार्‍यांचे “जगाची भाषा? कोणत्या जगाची भाषा? आणि ती जगाची भाषा असेल तर आमचा जपान देश त्या जगात नाही !!” हे बाणेदार उद्गार जपानी माणसाच्या खर्‍या अर्थाने स्व-तंत्र व स्वावलंबी असण्याचे द्योतक आहेत.

याच अमृतमंथन अनुदिनीमधील ’इंग्रजी भाषेचा विजय’ हा लेख आपण वाचला का? इंग्रजांनी आपल्या भाषेबद्दलचा न्यूनगंड दूर सारून फ्रेंच भाषेची मानसिक अधिसत्ता झुगारून दिली नसती तर नंतरच्या काळात जगभर जिंकलेल्या प्रदेशांमध्ये व इंग्रजांच्या वसाहतींमध्ये (अमेरिका, ऑस्ट्रेलियासह) ते फ्रेंच भाषेचाच प्रसार करीत राहिले असते आणि आज फ्रेंच भाषा ही सध्याच्या इंग्रजी भाषेहूनही अधिक बलाढ्य झाली असती; ही गोष्ट आपण नाकारू शकतो का?

थोडक्यात सांगायचे म्हणजे ’भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ या म्हणीप्रमाणे ’न्यूनगंडग्रस्तापुढे अनंत समस्यांचा राक्षस’ आणि ’कणखर स्वाभिमान्यापुढे यशाच्या पायघड्या’ असेच भाष्य भारतीयांच्या भाषाधोरणाच्या बाबतीत करावे लागेल.

Saturday, October 24, 2009

करीअर निवडी साठी

करीअर निवडी साठी..........

Thursday, September 10, 2009

आपन विचार करा .....................

Tuesday, June 9, 2009

सुंदर चेहरा की सुंदर मन ?


Monday, May 25, 2009

ग्राहकांचे अधिकार


ग्राहकांचे अधिकार

  • जनतेच्या जीवितास व मालमत्तेच्या दृष्टीने घातक असा माल बाजारात विकला जाऊ नये यासाठी संरक्षण.
  • बाजार पेठेतील मालाची गुणवत्ता, वजन, क्षमता, शुध्दता, दर्जानुसार किंमत जाणून घेणे
  • दुकानात अथवा बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू व त्याच्या विविध किंमती पहाण्याच्या, हवी ती पसंतीस पडलेली वस्तू विकत घेणे.
  • ग्राहक मंचासमोर बाजू मांडणे, चर्चा करणे, मार्गदर्शन घेणे, ग्राहक हितासाठी लक्ष देणे.
  • व्यापार्‍यांकडून होणार्‍या ग्राहकांची पिळवणूकीसंदर्भात दाद मागणे.
  • ग्राहक मंचच्या कायद्यासंदर्भातील शिक्षण घेणे.

    तक्रार केव्हा कराल?
  • खरेदी केलेला माल खराब असल्यास ...
  • खरेदी केलेल्या मालाच्या किंमतीपेक्षा व्यापार्‍याने अधिक किंमत घेतली असल्यास ...
  • जीवितास किंवा सुरक्षिततेस घातक ठरणारा माल (वस्तू) दुकानात ठेवला असेल अथवा विक्री केला असल्यास...
  • विकलेल्या वस्तुचे वजन आणि प्रत्यक्षात छापील असलेले वजन यात फरक आढळल्यास ...
  • जुना अथवा खराब माल नवीन वेष्टनात आकर्षक पध्दतीने ठेवून, ग्राहकांना उत्तम दर्जाचा माल असल्याचे सांगून फसवणूक केल्यास ...
  • मालाची विक्री करताना योग्य चाचणी न घेतलेला माल अन्य मालाच्या तुलनेत स्वस्त दरात देऊन ग्राहकांची दिशाभूल करीत असल्यास ...
  • मालाच्या वस्तुस्थिती संदर्भात वेष्टनावरील माहिती खाडाखोड केल्यास, चिकटपट्टी लावल्यास व त्या ठिकाणी चुकीची माहिती छापल्यास उदा.मुदत बाह्य तारखेत खाडाखोड करणे, वजनाच्या ठिकाणी जादा वजन दर्शवणे, किंमतीत खाडाखोड करणे.
  • स्वत:चा माल खपविण्यासाठी ग्राहकाला खोटी आश्वासने देऊन सातत्याने प्रचार व प्रसार केल्यास.
  • मालाचा साठा करुन तो विक्री न केल्यास अथवा भाववाढ होण्याची वाट पाहून नंतर विक्री केल्यास ...
  • आपला खराब माल जास्तीत जास्त खपावा म्हणून वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक माध्यमाद्वारे अथवा अन्य जाहिरात माध्यमातून प्रसिध्दी करुन ग्राहकांना विकल्यास व तसे पुरावे असल्यास...
  • ग्राहकांसाठी भेटवस्तू, बक्षिसे किंवा इतर मोफत वस्तू देण्याच्या योजनेत सहभागी करुन घेऊन नंतर योजनात फेरफार केल्यास, निकाल लावण्यास टाळाटाळ केल्यास ...

    कोणाविरुध्द तक्रार करावी ?
  • किराणा माल विक्रेता ...
  • औषध विक्रेता ...
  • शीतपेय विक्रेता ...
  • ट्रव्हल एजंट ...
  • सर्व प्रकारचे व्यापारी ...
  • शेतीची बियाणे, औषधे तसेच अवजारे विक्रेता ...
  • हॉस्पिटलमधील डॉक्टर्स ...
  • पोस्ट खाते किंवा कुरिअर तसेच बँक सेवा ...
  • दूरध्वनी, पाणी, गॉस संदर्भातील कार्यालय ...
  • वीज कनेक्शन आणि रस्ते संबंधित कार्यालय ...
  • विमा, शेअर किंवा कर्जरोख्यांची खरेदी विक्री ...
  • एसटी, रेल्वे तसेच अन्य वाहन विक्रेते ...
  • शिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे ...
  • फ्लॉट अथवा प्लॉट विक्रेता ...
  • जाहिराती सादर करणार्‍या संस्था, मॉडेल्स ...
  • पोस्टर्सवरील मजकूर आणि जाहिरात प्रसिध्द करणार्‍या संस्था ...
  • वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे ...

    तक्रार कशी कराल?
  • मालासंदर्भात काही दोष आढळून आल्यास जिल्हा ग्राहकमंच्याकडे साध्या कागदावर अथवा टंकलिखित तक्रार सहा प्रतीत सादर करावी. एकापेक्षा अनेक ग्राहकांच्या तक्रारी असतील तर जिल्हा ग्राहक मंचाच्या परवानगीने एक किंवा अधिक ग्राहक तक्रार करु शकतात.
  • तक्रार दाखल करताना मुद्देसुद माहिती द्यावी तसेच दोषपूर्ण मालाचे नमुने सोबत सादर करणे आवश्यक आहे. पुरावे सादर करतांना माल खरेदी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे. त्या पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूचे नाव, विवरण, उत्पादक कंपनीचे नाव, हमी कालावधी आदी नेंदी घ्याव्यात.
  • तक्रारदाराने प्रादेशिक भाषेतील अर्जाबरोबरच इंग्रजी भाषेत अर्ज व तपशील दिला तर ग्राहक मंच तसेच आयोगाला कार्यवाही करणे सुलभ होते.
  • तक्रार दाखल करतांना फक्त पीडित ग्राहकालाच नव्हे तर त्याच्या वतीने दुसर्‍यांनाही तक्रार करता येते.

    तक्रारीची कार्यवाही
    अ.क्र- तक्रारीचे स्वरुप कार्यवाही
    १.-तक्रार दाखल केल्यानंतर-६ महिन्यात कार्यवाही
    २.-मालाची प्रयोगशाळेत तपासणी-४५ दिवसांचा कालावधी
    ३.-२० लाख रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-जिल्हा ग्राहक मंचाकडे सुनावणी
    ४.-१ कोटी रुपयापर्यंतची नुकसान भरपाई-राज्य आयोगाकडे सुनावणी
    ५.-१ कोटी रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई-राष्ट्रीय आयोगाकडे सुनावणी

    तक्रार दाखल करतांना घ्यावयाची काळजी
  • तक्रारदाराचे नाव व पत्ता :
  • विरुध्द पक्षाचे नाव व पत्ता :
  • तक्रारीचा विषय :
  • तक्रारीबाबतचे पुरावे, दस्तऐवज :
  • तक्रारदाराने मागणी केलेली नुकसान भरपाई :
  • ठिकाण, दिनांक व सही :

    तक्रार दाखल करतांना येणारा खर्च
    अ.क्र-नुकसानीची रक्कम-भरावयाची रक्कम
    १.-१ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास १०० रुपये
    २.-१ ते ५ लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास २०० रुपये
    ३.-५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मागितल्यास ४०० रुपये

    राज्य आयोगाकडे अपील का? व कसे करावे?
  • जिल्हा न्यायालयाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती राज्य आयोगाकडे ३० दिवसांच्या आत अपील करु शकते.
  • जिल्हा ग्राहक मंचाच्या आदेशाने ग्राहकाला कोणतीही रक्कम भरावयाची असेल तर, अपील करणार्‍या अशा व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा २५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राज्य आयोग अशा अपिलाची दखल घेणार नाही.
  • राज्य आयोगाकडे तक्रार करतांना संपूर्ण तक्रारीचे स्वरुप सुस्पष्ट लिहावे. पुरावे सादर करावेत.
  • अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून राज्य आयोग ९० दिवसाच्या आत अपिलाची सुनावणी करतो.
  • अपीलकर्त्यांने अपील अर्जासोबत राज्य आयोगाच्या कार्यालयीन प्रयोजनासाठी तक्रार अर्जाच्या सहा प्रती जोडणे आवश्यक आहे.
  • अपिलाच्या सुनावणी काळात अपीलकर्त्याला स्वत: आयोगासमोर उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. जर अपीलकर्ता अनुपस्थित राहिला तर आयोग एकतर्फी निकाल देतो.
  • अपीलाच्या संदर्भात राष्ट्रीय आयोगाचे आदेश पक्षकारांना मोफत देण्याची तरतूद या कायद्यात आहे.

    राष्ट्रीय आयोगाकडे अपील का? व कसे करावे?
  • राज्य आयोगाचा निकाल असमाधानकारक वाटल्यास संबंधित व्यक्ती ३० दिवसांच्या आत राष्ट्रीय आयोगाकडे अपील करु शकते.
  • राज्य आयोगाच्या आदेशान्वये कोणती रक्कम भरणे असेल तर अपील करण्यार्‍या ग्राहकाने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ३५ हजार रुपये यापैकी जी कमी असेल, अशा रकमेचा भरणा केल्याशिवाय राष्ट्रीय आयोग अशा व्यक्तिंच्या अपीलाची दखल घेणार नाही.
  • राष्ट्रीय आयोगाकडे ग्राहकाने अपील दाखल केल्यानंतर अपीलाची सुनावणी, अपील स्वीकार केल्याच्या दिनांकापासून ९० दिवसांच्या आत केली जाते.
  • अपिलकर्ता किंवा पक्षकाराचे विरुध्द राष्ट्रीय आयोगाने एकतर्फी निकाल दिल्यास बाधित पक्षकाराला आयोगाकडे आदेश रद्द ठरविण्यासाठी अर्ज करता येतो.
  • अपीलकर्त्यांच्या अर्जावरुन किंवा राष्ट्रीय आयोगाला स्वत:हून कोणत्याही वेळी, न्यायाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास, राज्यातील कोणत्याही जिल्हा ग्राहक मंचाकडील प्रलंबित प्रकरण दुसर्‍या जिल्हा मंचाकडे किंवा एका राज्य आयोगामधून दुसर्‍या राज्य आयोगाकडे वर्ग करण्याचा अधिकार आहे.

    सर्वोच्च न्यायालयाकडे अपील का? कसे करावे?
  • राष्ट्रीय आयोगाने दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीला असा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करता येते.
  • राष्ट्रीय आयोगाच्या आदेशान्वये रक्कम भरणे असेल तर, अपील करणार्‍या व्यक्तीने ठरवून दिलेल्या पध्दतीने आदेशाच्या ५० टक्के रक्कम किंवा ५० हजार रुपये यापैकी जी कमी असेल ती भरल्याशिवाय न्यायालयात अपील करता येणार नाही.
  • जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्या आदेशाविरुध्द संबंधिताने अपील न केल्यास आदेश अंतिम समजला जातो.

    आदेशाचे अनुपालन न केल्यास दंड व कारावास
  • जिल्हा मंच, राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग यांच्यासमोर दाखल करण्यात आलेली तक्रार निरर्थक असल्याचे आढळल्यास मंच किंवा आयोग लेखी कारणे नोंदवून अशी तक्रार फेटाळतात. तसेच पक्षकाराला १० हजार रुपयांपेक्षा अधिक नसेल एवढ्या खर्चाची रक्कम देण्याबाबत आदेश देतात.
  • ज्यांच्याविरुध्द तक्रार करण्यात आली, असा कोणताही व्यापारी किंवा राष्ट्रीय आयोग यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर करीत असेल तर किंवा अनुपालन करण्यास चुकत असेल अशा बाबतीत संबंधितास कारावास आणि दंडाची शिक्षा आहे. त्यामध्ये एक महिन्यापेक्षा कमी नसलेल्या परंतु तीन वर्षापर्यंत वाढवता येण्याजोग्या मुदतीच्या कारावासाची आणि दोन हजार रुपयांपेक्षा कमी नसलेल्या परंतु १० हजार रुपयापर्यंत वाढविता येण्याजोग्या दंडाची किंवा दोन्हींची शिक्षा दिल्या जाण्यास पात्र असेल. अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे.

    राज्य ग्राहक आयोगाचा पत्ता :
    अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्राहक विवाद निवारण आयोग,
    प्रशासकीय महाविद्यालय, कक्ष क्र.१ व २, हजारीमल सोमाणी मार्ग, मुंबई - ४०० ००१। !!आन्नासाहेब चौधरी !!
  • Saturday, May 23, 2009

    महाराष्ट्र माझा


    लाल काळी माती इथलीअठरापगड जातीकणखर आहेत मनं अमुचीफडके झेंडा जगीशिवरायाचे वारस आम्हीकृष्णा कोयना माताविठुराया तर बाप अमुचासह्याद्री आहे सखा
    इथे जन्मला शेर शिवबाइथे जन्मली गानकोकिळाइथेच जन्मले लोकमान्य अनइथे जन्मले ग्यानबा तुका
    अभेद्य आहे अजोड आहेआहे महाराष्ट्र अमुचाइथे जन्मलो इथे वाढलोपावन झाला जन्म अमुचा
    अखंड वादळे झेलीत राहीलमहाराष्ट्र माझाशतकानुशतके असाच राहीलमहाराष्ट्र माझा

    !! आन्नासहेब चौधरी !!

    Tuesday, January 27, 2009

    माझा मराठा

    मराठा
    मी मराठा आहे! सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन त्याचे दात अशी आमची मर्द मराठा जात पहा चाळुन पाने आमुच्या इतिहासाची. महाराष्ट्राच्या मातीला , मराठ्याच्या छातीला, अवघ्या प्रुथ्वीतलावर कधीहि तोड नव्हती, नाहिये आणि यापुढेहि नसनारच. कारण आम्हीच राजे होतो, आम्हीच राजे आहोत अन भविष्यातही आम्हीच राजे राहनार. आम्ही राजे होतो ते समशेरीच्या जोरवर अन मनगटातल्या बळावर. होय, मी तोच मराठा ज्या कुळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून महाराष्ट्र उभा केला राजांनी! ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही सहिष्णुतेला. दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची संवेदनाही भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला शॄंगार कधीचं गमावला नाहिये. प्रतिक आहेत. इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक उज्ज्वल भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा. आणि हे बदलण्याची ताकत आहे मराठयांच्या मनगटात... सशक्ता आणी सशसत्र भारत बनविणे हे माझे स्वप्न आहे ।। स्वप्न आजचे, सत्य ऊद्याचे या सत्येला पंख विजयाचे ।।ज्या मायेच्या कुशीत स्वराज्याच देखण स्वप्न निर्माण झाल त्या राजमाता जिजावू त्या स्वप्नाला सत्या मधे उतरविनारे असे राजे छत्रपती

    Monday, January 19, 2009


    मी अन्नासाहेब चौधरी सुरवात एका नव्या जीवनाला .......!आम्ही आता आम्हाच्या मराठा समाज साठी प्राण द्यायला तयार आहोत आता हे प्राण आम्हाचे नाही तर सम्पूर्ण मराठा समाज चे आहेत आम्ही हे जीवन शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहेआज १८०० शेताकर्यानी आत्महत्या केल्यात त्या मध्ये १५०० शेतकरी मराठा आहेत हे काय आहे ...........!जरा विचार करा मराठा म्हणजे एक कुटूब आणि त्या कुटुबातला सदस्य होय .......!मी माझ्या कुटुबासाठी काही तरी करणार हे जीवन फक्त शिवाजी महाराजा च्या व आई जिजाऊ च्या चरनी अर्पण केले आहे आपलाच अन्नासाहेब चौधरी